रविवार, २३ नोव्हेंबर, २०१४

अरे जीवना तूच सांग ।

अमाप सुख आहे सगळ्यांच्याच पदरात,
पण ते अनुभवायला
आज वेळ नाही…

आईच्या अंगाईची जाणीव आहे,
पण आईला आज
‘आई’ म्हणायलाच वेळ नाही…

सगळी नाती संपवुन झालीत,
पण त्या नात्यांना
पुरायलाही आज वेळ नाही…

सगळ्यांची नावं मोबाईल मध्ये सेव आहेत,
पण प्रेमाचे चार शब्द
बोलायलाही आज वेळ नाही…

ज्या पोराबाळांसाठी मेहनत दिवस-रात्र करतात
त्यांच्याकडे क्षणभर
बघायलाही आज वेळ नाही…

सांगेल कोण कशाला दुस-याबद्द्ल,
जेव्हा ईथे स्वतःकडेच
बघायला वेळ नाही…

डोळ्यावर आलीये खुप झोप,
पण आज कोणाकडे
झोपयलाही वेळ नाही…..

ह्रदयात वेदनांचा पूर वाहतोय,
पण ते आठवुन
रडायलाही आज वेळ नाही…

परक्यांची जाणीव कशी असेल?
जर ईथे आपल्याच माणसांसाठी आज वेळ नाही…

आयुष्यात पुढे जाण्यासाठी चाललेल्या,
या संघर्षात जरा मागवळून;
पहायलाही आज वेळ नाही…

अरे जीवना तूच सांग!
जगण्यासाठीच चाललेल्या या धावपळीत जगायलाच आज वेळ नाही…!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा